ही वाट आणि तो वाट... सर्व वाटा सारख्याच असतात. त्या सर्वत्र जातात किंवा कोठेही जात नाही. काही जंगलातून जातात, काही वैराण वाळवंटातून, काही माळरानावरून, काही समुद्राच्या फेसाळणाऱ्या कडेने; मग तिच्याऐवजी हीच का निवडायची? कारण आहे... त्या वाटेवर प्रेम असतं, मायाममता असते, आपुलकीचा ओलावा असतो.
त्या प्रवासाचं पाऊल आणि पाऊल सुखाचं असतं... पण वाटेवर जर प्रेम नसेल, जर फिकीर नसेल जर पाऊल पाऊल वेदनेचं असेल.. पावला- पावलागणिक तुम्ही आयुष्याच्या आणि दैवाच्या नावाने बोटं मोडत राहाल... अणि तरीही प्रवास थांबणारच नाही... वाटा संपणारच नाहीत... ही, नाहीतर दुसरी... नाहीतर तिसरी... पावलं पडत राहिली पाहिजेत, थांबून उपयोगाचं नाही.
ही वाट आणि तो वाट... सर्व वाटा सारख्याच असतात. त्या सर्वत्र जातात किंवा कोठेही जात नाही. काही जंगलातून जातात, काही वैराण वाळवंटातून, काही माळरानावरून, काही समुद्राच्या फेसाळणाऱ्या कडेने; मग तिच्याऐवजी हीच का निवडायची? कारण आहे... त्या वाटेवर प्रेम असतं, मायाममता असते, आपुलकीचा ओलावा असतो.
त्या प्रवासाचं पाऊल आणि पाऊल सुखाचं असतं... पण वाटेवर जर प्रेम नसेल, जर फिकीर नसेल जर पाऊल पाऊल वेदनेचं असेल.. पावला- पावलागणिक तुम्ही आयुष्याच्या आणि दैवाच्या नावाने बोटं मोडत राहाल... अणि तरीही प्रवास थांबणारच नाही... वाटा संपणारच नाहीत... ही, नाहीतर दुसरी... नाहीतर तिसरी... पावलं पडत राहिली पाहिजेत, थांबून उपयोगाचं नाही.