मानसाचं मन आरशासारखं असतं. त्याच्या आजूबाजूला जे जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब त्याच्या मनात पडतं. आजूबाजूच्याच प्रतिमा मनात उमटतात. दृष्य किंवा प्रसंग बदलतील तशा त्या प्रतिमाही बदलत जातात. संवेदनशील मनात या प्रतिमा जरा अधिक काळ रेंगाळतात. क्वचित कधी ठसतातही. त्यांची जात, पोत आणि प्रत यांची शहानिशा अशा मनांकडून केली जाते. मनाला भिडणाऱ्या दुष्यांची, प्रसंगांची संभाषणांची नोंद मनात केली जाते.
मानसाचं मन आरशासारखं असतं. त्याच्या आजूबाजूला जे जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब त्याच्या मनात पडतं. आजूबाजूच्याच प्रतिमा मनात उमटतात. दृष्य किंवा प्रसंग बदलतील तशा त्या प्रतिमाही बदलत जातात. संवेदनशील मनात या प्रतिमा जरा अधिक काळ रेंगाळतात. क्वचित कधी ठसतातही. त्यांची जात, पोत आणि प्रत यांची शहानिशा अशा मनांकडून केली जाते. मनाला भिडणाऱ्या दुष्यांची, प्रसंगांची संभाषणांची नोंद मनात केली जाते.